Friday, December 10, 2010

माझी देवाची संकल्पना: भाग 2




माझी देवाची संकल्पना: भाग 2
पाठील पान तर तुम्ही वाचलंच, आपण त्यात दोन वर्ग पाहिलेत ते म्हणजे आस्तिक आणि नास्तिक. तर मित्र मैत्रिणिनो, नास्तीकांबद्दल तर मी गेल्या भागात च लिहिला.. पण हा जो आस्तिक वर्ग आहे ना वो भी
काम नाही हे... दुध से धुला हुवा नाही हे.. त्यात हि बरेच प्रकार आहेत..

आता आस्तिक असणं म्हणजे काही फक्त देवासमोर बसून मंत्र पूजा करणं नव्हे.. पण बऱ्याच जवळ जवळ ९०% लोकांनी ह्यालाच आस्तिक पणाची व्याख्या करून टाकलेला आहे.. म्हणजे कसा देवासमोर बसून मंत्र पूजा म्हटलं कि झाला ह्यांनी पुण्य कमवलं मग बाकी काही हि करायला ते मोकळे...

एक उदाहरण देते.... एखादी व्यक्ती सुसंस्कृत घरातली खूप पूजा पाठ करते... मंत्र, श्लोक, पूजा पाठ, साधना अगदी सर्व काही वेळच्या वेळी, चांगल चांगल वाचन केला जाता सुविचार सांगणारं, चांगले चांगले कार्यक्रम पहिले जातात चांगली कर्म करा सांगणारी.. गुरु केले जातात, गुरुचे फोटो लावले जातात, प्रार्थना केली जाते... अगदी सगळ सगळ साग्रसंगीत पणे केला जाता..

पण हे सगळ करत असताना खरच किती जण हा विचार करतात, किती जण शांत चित्ताने बसून आपल्या मनाला विचारतात कि,
" खरच मी ईश्वराने दाखवलेल्या मार्गावर जात आहे का?,
खरच मी सद्गुरूने जो मार्ग दाखवला आहे त्यावर चालत आहे का?
खरच मी माझ्या वागण्याने मुद्दाम कोणाला दुखावत तर नाही आहे ना?

खऱ्या खुऱ्या अर्थाने मी ईश्वरभक्ती, सत्कर्म करत आहे का?"
खूप च कमी लोकं हि प्रश्न स्वतःला विचारात असणार, हे आज लोकांच्या वागण्यावरून च कळत.
अरे हि साधी गोष्ट ह्या लोकांना कळत नाही कि, ज्या ईश्वराला प्रस्सन करण्यासाठी आपण पूजा, पाठ, मंत्र, होम, हवन करत आहोत तो तुमच्यावर प्रस्सन होईल तरी कसा.. जर तुम्ही त्याने सांगितलेली वाट च सोडून चालू लागलात तर.. फक्त आपली काम व्हावी, आपल्याला मुक्ती मिळावी, चांगली नोकरी लागावी, सगळ नीट व्हावा म्हणून त्याला वर वर पूजा करून प्रस्सन करण्याचा केविलवाणा प्रयत्न करत राहणं
म्हणजे निव्वळ मूर्खपणा आहे...

त्यापेक्षा खऱ्या अर्थाने उघड डोळ्यांनी देवाची संकल्पना समजून घेतली तर.. माणसाला खऱ्या अर्थाने देव मिळू शकतो हि साधी गोष्ट आहे.. आणि ह्या साठी काही खास करण्याची गरज नाही.. ईश्वराचे वास्तव्य हे आपल्या आत्म्यात आहे तेव्हा हा आत्मा शुद्ध ठेवला, विचार शुद्ध ठेवलेत कि सगळच कसं छान होणार.


हा जन्म आपल्याला एकदाच मिळाला आहे तर त्यात जितका चांगल करता येईल तितका चांगला करून देवाजवळ जाण्याचा मार्ग मोकळा करता येतो.. हे ह्यासाठी सांगते कारण बऱ्याच लोकांचा मत असता कि
"आयुष्य एकदाच मिळाला आहे मज्जा मस्ती आता नाही करणार तर केव्हा करणार आपण" तर हे म्हणन योग्य आहे पण त्या मजा मस्तीला हि काही मर्यादा असल्या काही तत्व असले तर आपण खऱ्या अर्थाने आयुष्याचा आनंद घेऊ शकतो.. आयुष्याच्या शेवटच्या स्क्षणी आपण समाधानाने डोळे मिटू शकतो..

मनावर कसला हि ओझं ना ठेवता आपण ह्या जगाचा निरोप घेऊ शकतो.. आणि एवढा जरी आपल्याला जमला तरी.. आपण ईश्वराला मिळवला च म्हणून समजा.. 

माझी देवाची संकल्पना





माझी देवाची संकल्पना

काही वेळा मला न खूप च गम्मत वाटते हा काही लोकांची म्हणजे बघा आपल्या मान्युषा वर्गात दोन देवाशी जोडले गेलेले एकूण दोन वर्ग आहेत एक म्हणजे आस्तिक जे प्रेमाने, आपुलकीने देवाचा नाव घेत राहतात आणि कर्म करत राहतात तर दुसरे आहेत नास्तिक जे नेहमी शिव्या घालून पुन्हा पुन्हा त्यांचा च नकळत देवाचा नाव घेत राहतात.... मला त्यांचीच गम्मत वाटते आणि कीव हि येते... कारण त्यांना आस्तिक लोकं मूर्ख वाटत असतात. आणि कीव का वाटते ते हि सांगते पण आधी माझी देवाबद्दल ची संकल्पना सांगते.

मी काय किवा कोणी दुसरे काय प्रत्यक्षात देवाला कोणी हि पाहिलेला नाही.. मग आपण कसा बरं म्हणणार कि देव आहे म्हणून? तर मला सांगा तुम्हाला जा वारा लागतो तो तरी तुम्ही पहिला आहे का? तुम्ही जो श्वास घेता तो तरी तुम्हाला दिसतो का? अशा बऱ्याच न दिसणाऱ्या गोष्टींवर आपण न बघून सुद्धा विश्वास ठेवतो मग देवावर का नाही. ह्या ज्या बऱ्याच गोष्टी आहेत त्या आपण जरी पहिल्या नाही तरी अनुभवत असतो.. तसा देवाला अनुभवायला सुद्धा बऱ्याच गोष्टी आपल्या आजू बाजूला असतात पण हे नास्तिक वर्गात मोडणारी लोकं त्याकडे सरळ सरळ दुर्लक्ष करतात आणि त्याला देतात science च नाव... आणि फक्त नास्तिक नाही हा आस्तिक लोकं हि आजूबाजूला देव बरायचं रूपांनी मदत करायला येतो पण ह्या आस्तिक लोकांच्या डोळ्यावर सुद्धा झापड असतात ते सुद्धा त्या देवाला ओळखू शकत नाहीत.. स्वताचे स्वभाव दोष बघायचे सोडून देवाला दोष द्याच काम regular basis वर सुरु असता.

आता बघा रोज सकाळी ठरलेल्या वेळेवर पाहते सूर्योदय होतो त्याचप्रमाणे ठरलेल्या वेळेवर सूर्यास्त होतो. वारा वाहतो, पाऊस पडतो, बिजारोपणाने झाड उगवत, आई च्या पोटातून बाळ जन्माला येत, ९ महिने ते आई च्या पोटात तयार होता.. दिवसाला अनेक जण आई च्या कुशीत जन्माला येतात तसाच अनेक जण मृतुच्या कुशीत विसावतात.. हा सर्व हिशोब ठेवणारी कोणीतरी शक्ती हि नक्कीच असणार भले ती मूर्त स्वरुपात नसणार (म्हणजे जसा गणपती, देवी असं मूर्त नाही) ती अमूर्त असणार पण मानवाची वृत्ती आधीपासून अशीच आहे कि काही विलोभनीय पहिला कीच त्याचा मन त्यावर जडता म्हणून त्या अमूर्त स्वरूपाला मूर्त स्वरूप देण्यात आला आहे. जी लोकं आस्तिक आहेत त्यांना संकट आली, उदास वाटल जेव्हा कोणीही आपला नाही असं वाटत त्यावेळी मन मोकळ करायला, आधार मागायला त्यांचाजवळ देव असतो.. ते त्या ईश्वरासमोर नतमस्तक असतात त्यांचा मनाला नेहमी जाणीव असते कि आपल्यापेक्षा कोणती तरी मोठी शक्ती ह्या जगात आहे जी आपल्यावर लक्ष ठेऊन आहे.. त्यामुळे ती व्यक्ती चांगलेच कर्म करते.. किवा खराब हि कर्म केलीत तरी नंतर पश्चाताप होऊन केलेली चूक भरून काढायसाठी चांगली कर्म करण्याची त्यांची तयारी असते.. हाच देव दुख्हात त्या व्यक्तीचा आधार बनतो.. हाच देव सुखात त्या व्यक्तीचा सखा बनतो.. हाच देव संकटात त्या व्यक्तीचा आत्मविश्वास बनतो.. आणि ह्याच सर्व गोष्टीना नास्तिक वर्ग मुकलेला असतो म्हणून मला त्यांची कीव येते...
क्रमश

आधार प्रितीचा




आज दिवाळी चाच पण लक्ष्मीपूजना नन्तर चा दिवस म्हणजे आज तसा काही नाही सण नॉर्मल आपली दिवाळी आहे छान.... आज आमच्या office मध्ये खास पूजा आहे दिवाळी ची माझ्या एका मैत्रिणीचा तब्येत जरा नीट नव्हती.... तरी ती आली होती आम्ही सगळे बसून छान फुलांच्या पाकळ्या वेगवेगळ्या करत होतो..
तेव्हा बोलता बोलता ती बोलली कि आग काळ खूप वाद झाला घरात खर तर आज यायला जमणार होत कि नाही काही कल्पनाच नव्हती.. आम्ही उत्सुकतेने विचारला कि का ग काय झाला? त्यावर तिने सांगितला काल मी रात्री जेवली नाही तशीच झोपली आधी medicine सुरु त्यात हि भुकेली झोपली...आम्ही बोलली आग पण का झाला तरी काय... ती बोलली अग सगळ्यांचा म्हणन होत कि बर नाही आहे तर नको जाउस ऑफिस ला पण मला यायचा होत... कारण हे प्रसंग काही पुन्हा पुन्हा नाही येत... आणि आज काही लक्ष्मी पूजन हि नाही आहे... पण त्यांचा म्हणन असा कि आज जाणार मग तू थकणार मग उद्या कसा होणार एवढ सगळ उद्याची तयारी कोण करणार हि बोलली ते सगळ मी करायला तयार आहे ती जबाबदारी माझी.. मी करेन... पण सगळयांची तोंड उतरलेलीच होती..

तिचा ऐकला आणि तिचा वर वर आनन्दी अनि आत  दुखावालेला मन पाहुन मि बोलली अग् मग नाही ययचा होतस न एक दिवस.. त्यवर ति बोलली कि " अग पण मला याचा होत न रोज असता का असा आपल्या इथे ऑफिस मध्ये... काही नाही हे लग्नंतर असाच असत प्रत्येक ठिकाणी मन मारायचा..."

ऐकून खूप विटे वाटल पण काय तिला समजवणार मी सुधा.. कारण ती जे काही बोलली ती काही चूक नव्हताच... बरोबर च होत..... जर ह्याच ठिकाणी तिच्या घरचे बोलले असते कि बर तुला जायचा आहे न तू जा... काही काळजी करू नकोस आम्ही सगळे तुला मदत करू उद्या सगळ नीट होणार.... पण हे तिच्या काय आणि कोणाच्याही घरात बोलाल जात नाही... आज आपला समाज सुधारला आहे सुधारा आहे बोलतो फक्त पण मुळात काही हि नाही..... सुधारणेच्या नावाखाली... सर्व काही रीतसर सुरु आहे.... जी मुलगी नव्या घरातून तुमच्या घरात आली आहे... तिला तुम्ही समजा... तिचा हि जीव आहे तिची हि स्वप्ना आहेत... तिच्या हि इच्छा आहेत हे लक्षात घेऊन प्रत्येक जन जर चालला तर किती बर होईल सगळे त्रास च संपणार...
पण मुळात असा विचार कोणी हि करत नाही .. काय अपेक्षा असतात तिच्या... हे कोणी जनात नाही... तिला एकच हवा असता... तो म्हणजे आधार... आधार प्रीतीचा.. प्रेमाचा... आपुलकीचा... बाकी काही नाही तो मिळाला 
तर तुमच्यावर जीव हि ओवाळून टाकायला तयार असते ती...
.

आज ती नोकरी हि करते ते करताना कधी घाई असली तर तुमच्या छोटीशी  मदतीची अपेक्षा असते तिला... ती हि छोटीशी .... अति नाही...
तिच्या महिन्यातल्या अडचणीच्या दिवसात जेव्हा ती मानसिक रित्या जरा भाउक असते तेव्हा थोडा समजूतदार पण हवा असतो तिला....
नवरा असेल तर त्याने थोडा एकांतात वेळ द्यावा आपल्यासोबत फिरावं वाटत तिला....
घराबाहेर असली... ऑफिस ला असली तर दिवसातून एकदा phone करून चार शब्द प्रेमाने बोलावे बस इतकचं हवा असता तिला बाकी काही नाही.....
पण हे सगळ इतरांना कटकट वाटते.... त्यांना हे काळात नाही... कि तिला हवा आहे फक्त एक प्रीतीचा आधार....
आणि म्हणून मग तिला आठवत आपला माहेर... जिथे असतात आई बाबा काळजी घेणारे... आपण उशिरा आलो तर , रोज च उशिरा येतेस किवा उशिरा का आलीस.. हे न विचारता किती उशीर झाला बस मिळाली होती का... गाडीत जागा मिळाली होती का... कि उभीच आली हे विचारणारे...
बहिण असते मस्ती करणारी वेळ प्रसंगी आनंदाने मदत करणारी... ज्या नात्यांमध्ये नसतात कसलेही हेवे देवे.....आणि मग म्हणव लागत... गेले ते दिवस....

कोमेजून निजलेली एक परी राणी

 मित्र मैत्रिणिनो हि आहे एक सुंदर कविता,

जी व्यक्त करते एका बापाचे त्यांचा मुलीबद्दलचे विचार, काळजी आणि हो अशीच काहीतरीआई चे विचार असतात आपल्या मुलीबद्दलचे, कारण ह्या दोघांनी आपल्या बाळीला आपल्या डोळ्यांसमोर मोठा होताना पहिला असता पण तिचा पुढचं आयुष्य ते काही त्यांचा हातात नसता. मनात असतानाही ते काही दर वेळी तिला सावरू नाही शकत, सांभाळू नाही शकत तशीच काही शी व्यथा ह्या कवितेतून व्यक्त होते. तिच्या सुखसोयींसाठी धावपळ करता करता तिला देण्यासाठी वेळ च उरत नाही मग कधी ती मोठी होते आणि कधी ती सासरी जाते हे हि ते बिचारे पाहत च राहतात कविता वाचली कि सर्व काही डोळ्यासमोर येईल च....... हि कविता काही मी नाही लिहिली मला माझ्या एका मैत्रिणीने पाठवली पण ती मनाला खूप भावली म्हणून म्हटलं इथे लिहायला काय हरकत... तर मग वाचा हि कविता प्रत्येक मुलीला तिचे आई बाबा नक्कीच आठवतील त्यांचा काळजी घेणा आठवून नक्कीच डोळे भरून येतील, आणि त्यातही मुलगी जर सासुरवाशीण असेल तर प्रश्नच नाही.. डोळे हे भरायलाच हवे कारण शेवटी मुलीसाठी आई बाबा हे एकच असतात कोणी कितीही बोललं तरी
त्यांची जागा नाही घेऊ शकत ... किंबहुना ते कोणाला जमत हि नाही.. अर्थात अपवाद हि असतील असे अपवाद सापडले तर आनंदच आहे..... चला आता खूप प्रवचन दिला 
कविता वाचा..


कोमेजून निजलेली एक परी राणी,
उतरले तोंड डोळा सुटलेले पाणी
रोजचेच आहे सारे काही आज नाही
माफी कशी मागू पोरी मला तोंड नाही
झोपेतच घेतो तुला आज मी कुशीत
निजेतच तरी पण येशील खुशीत
सांगायची आहे माझ्या सानुल्या फुला
दमलेल्या बाबाची ही कहाणी तुला …

आटपाट नगरात गर्दी होती भारी
घामाघूम राजा करी लोकलची वारी
रोज सकाळीस राजा निघताना बोले,
गोष्ट सागायचे काल राहुनिया गेले
जमलेच नाही काल येणे मला जरी
आज परी येणार मी वेळेतच घरी
स्वप्नातल्या गाव मध्ये मारू मग फेरी
खऱ्या खुऱ्या परी साठी गोष्टीतली परी
बांधीन मी थकलेल्या हातांचा झुला
दमलेल्या बाबाची ही कहाणी तुला …

ऑफिसात उशिरा मी असतो बसून
भंडावले डोके गेले कामात बुडून
तास तास जातो खाल मानेने निघून
एक एक दिवा जातो हळूच विझून
अशावेळी काय सांगू काय काय वाटे

अथवा सोबत पाणी डोळ्यातून दाटे
वाटते की उठूनिया तुझ्या पास यावे
तुझ्यासाठी मी पुन्हा लहान ही व्हावे
उगाचच रुसवे नी भांडावे तुझ्याशी
चिमुकले खेळ काही मांडावे तुझ्याशी
उधळत खिदळत बोलशील काही
बघताना भान मला उरणार नाही
हासुनिया उगाचच ओरडेल काही
दुरूनच आपल्याला बघणारी आई

तरी सुद्धा दोघे जण दंगा मांडू असा
क्षणा क्षणा वर ठेवू खोडकर ठसा
सांगायची आहे माझ्या सानुल्या फुला
दमलेल्या बाबाची ही कहाणी तुला …

दमल्या पायाने जेव्हा येईल जांभई
मउ -मउ दूध भात भरवेल आई
गोष्ट ऐकायला मग येशील न अशी
सावरीच्या उशीहून मउ माझी कुशी
कुशी माझी सांगत आहे ऐक बाळा काही
सदोदित जरी का मी तुझ्या पास नाही
जेऊ माखू न्हाऊ खाऊ घालतो न तुला
आई परी वेणी फणी करतो न तुला
तुझ्या साठी आई परी बाबा पण खुळा
तो ही कधी गुपचूप रडतो रे बाळा
सांगायची आहे माझ्या सानुल्या फुला
दमलेल्या बाबाची ही कहाणी तुला …

बोळक्या मध्ये लुकलुकलेला तुझा पहिला दात
आणि पहिल्यांदाच घेतलास जेव्हा मउ भात
आई म्हणण्या आधी सुद्धा म्हणाली होतीस बाबा
रांगत -रांगत घेतलास जेव्हा घराचा तू ताबा
लुटू -लुटू उभा राहत टाकलास पाउल पहिलं
दूरचं पाहत राहिलो फक्त , जवळचं पाहायचं राहिलं

असा गेलो आहे बाळा पुरा अडकून
हल्ली तुला झोपेतच पाहतो दुरून
असा कसा बाबा देव लेकराला देतो
लवकर जातो आणि उशिरानी येतो
बालपण गेले तुझे गुज निसटून
उरे की तुझ्या माझ्या ओंजळी मधून
जरी येते ओठी तुझ्या माझ्यासाठी हसे
नजरेत तुझ्या काही अनोळखी दिसे
तुझ्या जगातून बाबा हरवेल का ग?
मोठेपणी बाबा तुला आठवेल का ग?
सासुराला जाता जाता उंबरठ्यामध्ये
बाबासाठी येईल का पाणी डोळ्यामध्ये?….

-Sandip Khare